WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

भीषण आगीत कापड दुकान जळून खाक

Image

शॉटसर्किटमुळे दुकानामालकाचे लाखोंचे नुकसान,

-प्रतिनिधी/सचीन मेश्राम

मारेगाव- शहरातील मार्डी रोडलगत येथील भर वस्तीत असलेल्या कापड व हार्डवेअर दुकानाला आग लागली. या आगीत कापड दुकान जळून खाक झाले. त्यात लाखोंचे नुकसान झाले. दरम्यान, आगीमुळे शेजारील एका दुकानालाही आग लागली. मात्र, एक तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझविण्यात युवकांना व अग्निशमन दलाला यश आले.

या घटनेत लाखोंचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ८:30 वाजताच्या सुमारास घडली.

मारेगाव तालुक्यातील रविंद्र काळे यांचे पाच वर्षांपासून कापड दुकानाचा व्यवसाय आहे. या दुकानात कपडे, फर्निचर व इतर सामान गच्च भरून होते. ते अचानक शॉर्टसर्किटमुळे संपूर्ण जळून खाक झाले. आगीचे कारण कळू शकले नसले, तरी लाईनच्या शॉटसर्किटने आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आग लागताच, आगीने उग्र रूपधारण केले. आगीचे धुर आकाशात लोळ पसरू लागले. दुकानाच्या शेजारी असलेल्या घरांनाही आगीची किरकोळ झड सोसावी लागली. आगीची वार्ता शहरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी वणी नगर परिषद व नगर परिषद अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी तब्बल दोन तास परिश्रम घ्यावे लागले त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

सामाजिक बांधिलकी दाखवीत पप्पू देठे, गणेश चौधरी, इमरान शेख यांनी आग विझविण्यासाठी यांनी पोलीस कर्मचारीसह आग विझविण्यात सहकार्य केले. यावेळी बघ्याची गर्दी असल्याने जनतेला नियंत्रीत करण्यासही या तरुणांनी मदत केली.

काळे यांच्या कापड दुकानाला अचानक आग लागली ही बातमी माध्यमातून वाऱ्या सारखी पसरली असून घटनास्थळावर आग विझविण्यासाठी युवकांनी धाव घेऊन सर्वोतोपरी प्रयत्न केले आणि आगीवर एक तासानंतर नियंत्रण मिळविले. यात कापड दुकानाचे लाखोचे नुकसान झाले. पण मात्र, सुदैवाने कुठलीही जिवित हानी झाली नाही.

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.