WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

मोठ्या भावानेच लहान भावाची कुराडीने केली हत्या

Image

सोनूपोड येथील थराराक...भाई का दुश्मन भाई

प्रतिनिधी- सचिन मेश्राम

मारेगाव- तालुक्यातील सोनुपोड येथील आरोपी काशिनाथ गंगाराम आत्राम यांनी दिली हत्याची कबुली. ता.प्र. मारेगाव तालुक्यातील बोटोनी पासून 3 की.मी. अंतरावर असलेल्या सराटी सोनूपोड येथील शेतीच्या ठेक्याचे चार हजार रूपये दिले नाही या क्षुल्लक कारणावरुन मोठ्या भावाने लहान भावाचा खुन केल्याची क्लेशदायक आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास घटना घडली.

तुकाराम गंगाराम आत्राम (वय 50) रा. सोनूपोड सराटी असे मृतकाचे नाव असून या खून प्रकरणी काशिनाथ आत्राम याला मारेगाव पोलीसानी ताब्यात घेतले आहे.

फिर्यादी मृतकाची पत्नी शेवंताबाई तुकाराम आत्राम यांच्या बयानानुसार मृतक तुकाराम आत्राम हा रात्री दरम्यान 9 वाजताच्या दरम्यान शेतामध्ये जातो असे घरी सांगून घरून निघून गेला. रात्रभर पती घरी परत न आल्याने घरच्यांनी शोधा शोध सुरु केली. तुकाराम कुठेच आढळला नाही. शेवटी शेताकडे शोध घेण्यासाठी गेले असता मृतक स्वताच्या शेताजवळ मृत अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती सदर मृतकच्या पत्नीने मोठ्या मुलाला सांगितले व सर्व आत्राम कुटुंबीयांनी शेताकडे धाव घेतली. यावेळी मृतकच्या डोक्याखाली रक्त सांडलेले होते तसेच गळ्यावर विचित्र जखमा घटनास्थळी आढळून आल्या. याबाबत आत्राम कुटुंबियांनी लगेच मारेगाव पोलिस ठाणे गाठून संशयित विरूद्ध तक्रार दाखल केली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुशिल कुमार नायक तसेच मारेगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा तपास केला असता या प्रकरणी संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. सदर घटनेचा अधिक तपास उपविभागीय अधिकारी यांचे मार्गदर्शना खाली मारेगाव पोलीस करीत आहेत

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.