WANICITY.COM ( वणी सीटी डॉट कॉम )

पांढरकवडा तहसील कार्यलयाचा चेहरा मोहरा बदलवून दाखवीन ! तहसीलदार सुरेश कव्हळे

Image

ग्राहक प्रहार संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाने केले स्वागत प्रसंगी काढले उदगार!

पांढरकवडा येथे नव्याने तहसीलदारपदी रुजू झालेले सुरेश कव्हले ह्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन /स्वागत करण्यात आले .लोणार येथील त्यांची कारकीर्द अतिशय चागली होती त्यांना उत्कृष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून राज्य शासनाने गौरविले .राळेगाव मध्ये त्यांची कारकीर्द अल्प होती पण तिथेही त्यांनी आपली छाप सोडली पांढरकवडा तहसील कार्यलयाचा चेहरा मोहरा बदलवून टाकील तसेच कोणी अधिकारी लाच मागत असेल तर मला येऊन सांगा असेही त्यांनी सांगितले .पांढरकवडा तालुक्यतील नागरीकांना भ्रष्टाचार मुक्त तहसील कार्यालय लवकर पाहायला मिळेल ,जनतेचे काम प्रलंबीत राहणार नाही असेही ते म्हणाले हया प्रसंगी ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ राजेंद्र आत्राम तसेच विलास पवार जिल्हा अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष ह्यांचे संयुक्त विध्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दामोधर बाजोरीया ग्राहक प्रहारचे जिल्हा कार्यध्यक्ष होते.कार्यक्रमाचे संचालन प्रसाद नावलेकर जिल्हा सचिव ग्राहक प्रहार संघटना ह्यानी केले आभार यशवंत काळे ह्यांनी मानले .कार्यक्रमाला भैय्यासाहेब ठमके जिल्हा सह सचिव, जयवंत बावणे पाटनबोरी सर्कल प्रमुख,प्रदीप भानारकर तालुका प्रचार प्रमुख, विनोदसेठ चमेडिया, अजय दुंमनवार,दिलीप वाढई ,नीरज गुरनुले ,निलेश वाभीटकर,मोहन म्यानेवार प्रहार जनशक्ती पार्टी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .

वणी, मारेगाव, झरी परिसरात जाहिरात करायची असल्यास संपर्क 👉 9730292827



share


Image

IAD NETWORK द्वारा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सहायता कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी निःशुल्क करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहे. सर्वांना ही सूचना आहे की सर्व कोर्स आपण निःशुल्क घेत आहे. आणि केवळ १००/- रू. सदस्यता नोंदणी फी आहे. या अभियानाचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळावा म्हणूनच आपण शुल्क घेत नाही आहे. जुळलेल्या सर्व नवीन सदस्यांना एक नियम आहे की दुसऱ्या दिवशी पर्यंत त्यांनी किमान २-३ नवीन विद्यार्थ्यांना या योजनेमध्ये सामिल करून घ्यावा. हे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांची सदस्यता रद्द करण्यात येईल. जास्त विद्यार्थी अभियानामध्ये जुळावे हाच यामागचा उद्देश आहे. सदस्यता अभियान ३० एप्रिल पर्यंत सुरू राहील.